Marathi govt jobs   »   Study Materials   »   Social Reformers of Maharashtra - Part...

Savitribai Phule Jayanti 2023, Savitribai Phule Biography, Activities and Social Work | सावित्रीबाई फुले जयंती 2023

Savitribai Phule Jayanti 2023: Today is the 192nd birth anniversary of Savitribai Phule. Savitribai Phule is a showrunner and inspiration for many girls and women. She arranged education for girls and people from the rejected sections of society. Savitribai Phule has made a special contribution to the education of girls and women. Savitri Bai was born on 3 January 1831 in Naigaon.

Pandita Ramabai has been working with a dedicated spirit for the overall salvation of women – especially the abandoned, and widowed.  In 1877, Ramabai’s parents died in the drought. Ramabai had mastered Sanskrit; But she could also speak Marathi, Hindi, Bengali, and Kannada fluently. In 1878 she came to Calcutta traveling with her brother Srinivas Shastri. There, however, his scholarship and intelligence were duly glorified. He was honored with the titles ‘Pandita’ and ‘Saraswati’ in the Senate Hall of Calcutta.

In this article, you will get detailed information about the Social Reformers of Maharashtra. In Part 6 You will get information about Social Reformers Savitribai Phule and Pandita Ramabai.

Social Reformers of Maharashtra- Part 6
Category Study Material
Exam Useful for All Exams
Subject History (Social Reformers)
Name Social Reformers of Maharashtra- Part 6
Savitribai Phule Jayanti 2023 192nd
Social Reformers Cover in this Article
  • Savitribai Phule
  • Pandita Ramabai

Social Reformers of Maharashtra – Part 6

Social Reformers of Maharashtra – Part 6: आज सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 03 जानेवारी 1831 मध्ये झाला होता. स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात मा. ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचा महत्वाचा वाट होता. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होत्या. महाराष्ट्रातील समाज सुधारक (Social Reformers of Maharashtra) घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा आहे. महाराष्ट्रातील समाज सुधाराकांवर Adda247 ने एक लेखमालिका सुरु केली आहे. आज या Social Reformers of Maharashtra – Part 6 आपण सावित्रीबाई फुले व पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

Adda247 App
Adda247 Marathi App

Social Reformers of Maharashtra- Savitribai Phule | महाराष्ट्रातील समाज सुधारक- सावित्रीबाई फुले

Social Reformers of Maharashtra- Savitribai Phule: सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांचे बारा वर्षांच्या ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले.

Social Reformers of Maharashtra- Savitribai Phule | महाराष्ट्रातील समाज सुधारक- सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले

कार्य

त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई (Savitribai Phule) आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.

1863 मध्ये त्यांनी गर्भवती व शोषित विधवांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याच घरात ‘बालहत्या रोखण्यासाठी घर’ सुरू केले. हुंड्याशिवाय किंवा जास्त खर्च न करता लग्नाची प्रथा सुरू करुन त्यांनी सत्यशोधक समाज (सत्य सत्य शोधणारी संस्था) स्थापन केली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहांना समर्थन देतात. त्यांना स्वतःची मुले नव्हती, परंतु त्यांनी ब्राह्मण विधवा मुलाचे शिक्षण घेतले आणि त्याला आंतरजातीय विवाहाची व्यवस्था केली.

सावित्रीबाई (Savitribai Phule) आणि जोतिबा यांनी देशातील शूद्र आणि अतिसूद्र महिलांसाठी क्रांतिकारक सामाजिक शिक्षण चळवळ उभी केली. 1848 मध्ये शाळा सुरू केल्यावर आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जोतिबाने महार आणि मंगांसाठी एक शाळा सुरू केली. परंतु सहा महिन्यांतच त्याच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर फेकले आणि शाळेचे काम अचानक ठप्प झाले.

गोवंडे पुण्यात आले आणि सावित्रीबाईंना (Savitribai Phule) घेऊन अहमदनगरला गेले. ती परत आल्यानंतर केशव शिवराम भावलकर यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. ज्योतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींना आणि मुलांना व्यावसायिक आणि व्यावहारिक शिक्षण देणे, त्यांना स्वतंत्र विचार करण्यास सक्षम बनविणे यावर भर दिला. त्यांचा असा विश्वास होता की ज्या शाळांमध्ये मुले उपयुक्त व्यापार आणि हस्तकला शिकू शकतात आणि त्यांचे आयुष्य आरामात आणि स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम असतील अशा औद्योगिक संस्थेशी जोडले जावे.

त्यांनी आग्रह धरला की, ‘शिक्षणाने एखाद्याला जीवनात योग्य-अयोग्य आणि सत्य आणि असत्य यांच्यात निवडण्याची क्षमता दिली पाहिजे.’ मुला-मुलींची सर्जनशीलता फुलू शकेल अशा जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे यश यावरून स्पष्ट होते की तरुण मुलींना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे आवडते, त्यामुळे त्यांचे पालक मुलींच्या अभ्यासाच्या समर्पणाची तक्रार करतील.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी (Savitribai Phule) कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. 1890) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी (Savitribai Phule) समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

इ.स. 1896-97 सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही (Savitribai Phule) प्लेग झाला. त्यातून 10 मार्च, इ.स. 1897 रोजी त्यांचे निधन झाले.

लेखन आणि मूल्यवान योगदान

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या कविता आणि इतर लेखन अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि ते भारताच्या जातीव्यवस्थेविरूद्ध संघर्षात अग्रगण्य आहेत. तिने काही अतिशय मौल्यवान लेखन एकत्र ठेवले आहे.

  • काव्याफुले- कवितासंग्रह, 1854
  • ज्योतिराव यांचे भाषण, सावित्रीबाई फुले संपादित, 25 डिसेंबर 1856
  • ज्योतिरावांना सावित्रीबाईंचे पत्र
  • मातोश्री सावित्रीबाई यांचे भाषण, 1892
  • बावनकाशी सुबोध रत्नाकर, 1892

सत्कार

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई (Savitribai Phule) फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या (Savitribai Phule) सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासुन 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.

Social Reformers of Maharashtra- Part 1 (भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका) Social Reformers of Maharashtra- Part 2 (जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे)
Social Reformers of Maharashtra- Part 3 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) Social Reformers of Maharashtra- Part 4 (लोकमान्य टिळक)
Social Reformers of Maharashtra- Part 5 (ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज)

Social Reformers of Maharashtra- Pandita Ramabai | महाराष्ट्रातील समाज सुधारक- पंडिता रमाबाई

Social Reformers of Maharashtra- Pandita Ramabai: (23 एप्रिल 1858 – 5 एप्रिल 1922) रमाबाई (Pandita Ramabai) यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई (Pandita Ramabai) नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या 15-16 वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना (Pandita Ramabai) आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. 1877 साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी (Pandita Ramabai) संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच; पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई (Pandita Ramabai) या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

Social Reformers of Maharashtra- Pandita Ramabai | महाराष्ट्रातील समाज सुधारक- पंडिता रमाबाई
पंडिता रमाबाई

रमाबाईंचा (Pandita Ramabai) कलकत्ता येथे केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले. तत्पूर्वीही त्या हिंदू धर्माविषयी साशंक झाल्याच होत्या. रमाबाईंचा अशा रीतीने सर्वत्र सत्कार होत असतानाच त्यांच्या बंधूंचा 1880 मध्ये मृत्यू झाला. त्या आता एकाकी झाल्या; परंतु कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलांनी मागणी घातल्यानंतर त्याच वर्षी त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रुढींविरूद्ध बंड पुकारले होते. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही; कारण थोड्याच दिवसांत (4 फेब्रुवारी 1882) अल्पशा आजाराने त्यांचे पती मरण पावले. वडील, आई, बहिण, भाऊ, पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत. 31 मे 1882 रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या व त्यांनी स्वतःला पूर्णतः समाज कार्याला वाहून घेतले.

बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी 1882 मध्ये प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. त्यांनी याच वर्षी स्त्रीयांसंदर्भातील स्त्रीधर्मनीति नामक पुस्तक लिहिले. मे 1883 मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीति या पुस्तकाच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या (Pandita Ramabai) वाँटिज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे, तसेच भूतदया व प्रेमाच्या शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः 29 सप्टेंबर 1883 रोजी वाँटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बरोबरच सनातनवादी विचारवंतांचा त्यांनी रोष ओढवून घेतला. त्यांना हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचवण्यास लागणारे मध्यस्थ हे त्यांना मान्य नव्हते. मुक्तीसदन बांधण्यापासून ते पूर्ण होऊन त्यांचे कार्य सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही रमाबाई पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून होत्या. म्हणूनच मुक्ती सदन अथवा मुक्तीमिशन हे रमाबाईंच्या (Pandita Ramabai) प्रभुवरील प्रगाढ श्रद्धेचे प्रतिक होते. 1993 मध्ये मुक्ती सदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरमा या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून शिकवित असत. त्यावरून त्यांचे मानवतावादी कार्य समोर येते.

आनंदीबाई जोशी यांच्या 6 मार्च 1886 रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी 1886 मध्ये अमेरिकेस गेल्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी ‘बालोद्यान शिक्षणपद्धती’ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन (1887-88) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे. एवढेच नव्हे, तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते, त्या पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण, चिकित्सा आपल्याला रमाबाईंच्या (Pandita Ramabai) या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते. त्यांच्या विचाराने अमेरिकन प्रभावित झाले. 1889 मध्ये यूनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या.

अमेरिकेहून 1 फेब्रुवारी 1889 रोजी परत आल्यानंतर 11 मार्च रोजी मुंबईला विधवांकरता ‘शारदा सदन’ नावाची संस्था त्यांनी काढली. त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरिता स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. ‘शारदा सदन’ मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वतंत्र दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे न्यावे लागले. २४ सप्टेंबर 1898 रोजी केडगावला ‘मुक्तिसदना’ चे उद्‌घाटन करण्यात आले. 1897 मध्ये मध्य प्रदेशात व 1900 मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात 300 हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. तत्पूर्वी 1898 साली रमाबाई जानेवारी ते ऑगस्ट ह्या कालावधीत पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या. त्यांच्या सांगण्यावरून रमाबाई असोसिएशन बंद करण्यात येऊन ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ ही नवी संस्था स्थापन करण्यात आली व ‘शारदा सदन’ ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचे क्षेत्र वाढविले.

आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईंनी (Pandita Ramabai) शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ‘मुक्त्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साह्याने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता ‘सायं घरकुला’ची व्यवस्था त्यांनी केली. 1919 साली रमाबाईंना (Pandita Ramabai) त्यांच्या ह्या कार्याबद्दल ‘कैसर-ई-हिंद’ हे सुवर्ण पदक मिळाले.

दुसऱ्यांकरिता अविरत कष्ट करणाऱ्या या समाजसेविकेचे व्यक्त्तिगत जीवन मात्र फार दुःखी होते. शेवटच्या काळात त्यांची एकुलती एक मुलगी मनोरमा ही मिरज येथे वारली (24 जुलै 1921) व त्यानंतर लवकरच केडगाव येथे रमाबाईंचेही (Pandita Ramabai) निधन झाले.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

See Also

Article Name Web Link App Link
List Of National Symbols Of India Click here to View on Website  Click here to View on App
List of Indian Cities on Rivers Banks Click here to View on Website  Click here to View on App
Computer Awareness Click here to View on Website  Click here to View on App
Country And Currency List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Cloud and Types of Wind Click here to View on Website  Click here to View on App
Longest Rivers in the World Click here to View on Website  Click here to View on App
Revolt Of 1857 In India And Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
List Of Top 10 Tallest Statues In The World Click here to View on Website  Click here to View on App
Maharashtra Etymology, History, And Origin Of Maharashtra Name Click here to View on Website  Click here to View on App
Dams In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Rights of Indian Citizens Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Fundamental Duties: Article 51A Click here to View on Website  Click here to View on App
List Of Governors Of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Nuclear Power Plant In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Largest Countries In The World By Area 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Important Newspapers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
FIFA World Cup 2022 Quiz Click here to View on Website  Click here to View on App
Role and Power of President Click here to View on Website  Click here to View on App
Census of India 2011 Click here to View on Website  Click here to View on App
Samyukta Maharashtra Movement Click here to View on Website  Click here to View on App
FIFA World Cup List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Classical And Folk Dances Of India Click here to View on Website  Click here to View on App
Governor General Of British India Before 1857 Click here to View on Website  Click here to View on App
Maratha Empire – History, Rulers, Rise, Administration Click here to View on Website  Click here to View on App
List of First-Ranked States in Mineral Production Click here to View on Website  Click here to View on App
Periodic Table of Elements Click here to View on Website  Click here to View on App
Forests in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Days in December 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Anti-Defection Law Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Quantitative Aptitude Formulas Click here to View on Website  Click here to View on App
Mensuration Formula For 2D And 3D Shapes Click here to View on Website  Click here to View on App
List Of Best Intelligence Agencies Of The World 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Various Corporation In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Nationalized Banks List 2022 Click here to View on Website  Click here to View on App
The World’s 10 Smallest Countries 2022 Click here to View on Website  Click here to View on App
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Click here to View on Website  Click here to View on App
Parliament Of India: Lok sabha Click here to View on Website  Click here to View on App
Supreme Court Click here to View on Website  Click here to View on App
AMRUT Mission Click here to View on Website  Click here to View on App
National Animal of India Click here to View on Website  Click here to View on App
Bird Sanctuary In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Important Rivers in Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
States And Their Capitals, 28 States And 8 Union Territories In India 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Types Of Winds Click here to View on Website  Click here to View on App
President’s Rule In A State Click here to View on Website  Click here to View on App
Mahatma Jyotirao Phule Death Anniversary 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Satavahana Dynasty: History, Ruler, And Other Important Facts Click here to View on Website  Click here to View on App
Important Boundary Lines Click here to View on Website  Click here to View on App
Indian Constitution: Framing, Sources, Parts, Articles, And Schedules Click here to View on Website  Click here to View on App
Importance of Plant Nutrients Click here to View on Website  Click here to View on App
Hill Stations In Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
Important Events Of the Indian Freedom Struggle Click here to View on Website  Click here to View on App
Profit And Loss Formula, Sample Questions Click here to View on Website  Click here to View on App
Jnanpith Awards 2022 Click here to View on Website  Click here to View on App
Chief Minister of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App
River System in Konkan Region of Maharashtra Click here to View on Website  Click here to View on App

FAQs: Social Reformers of Maharashtra

Q1. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

Ans. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.

Q2. भारताच्या प्रथम महिला शिक्षिका कोणाला म्हणतात?

Ans. भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना म्हणतात.

Q3. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?

Ans. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली.

Q4. अशीच महत्वपूर्ण लेख मला कुठे पाहायला मिळेल?

Ans. Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांचे नोटीफिकेशन, अभ्यासक्रम, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व अभ्यास साहित्य मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

When was Savitribai Phule born?

Savitribai Phule was born on January 3, 1831 in the village of Naigaon in the Satara district of Maharashtra.

Who is India's first female teacher?

India's first female teacher is called Savitribai Phule.

Who founded the Arya Mahila Samaj?

Arya Mahila Samaj was founded by Pandita Ramabai.

Where can I find such an important article?

On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.