Governor General of British India before 1857, Study Material for Nagar Parishad, ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे
Governor General of British India
Governor General of British India before 1857: In this article get the complete list of Governor General of British India before 1857 and Governor General of Bengal. Also we will learn some of the important points regarding each Governor General of British India in Marathi. Exam point of view this topic is very important. So let’s start.
Governor General of British India before 1857: Overview
Every subject is important in competitive exam, so you should study according to that pattern to get good success in competitive exam. For the convenience of students we are bringing information on important topics every day so that you can study the topic well by reading the article.
Governor General of British India before 1857: Overview
Governor General of British India before 1857 | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे
Governor-General of British India: स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता इतिहास या विषयात स्वतंत्रपणे व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित थेट प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण Governor General of British India before 1857 (ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
भारतात व्यापाराच्या उद्देशाने लंडनमध्ये 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणीने सुरुवातीस 15 वर्षासाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली. 1609 मध्ये राजा जेम्स पहिला यांनी कंपनीला अमर्याद कालावधीसाठी व्यापाराचा अधिकार दिला. कंपनीच्या वतीने गव्हर्नर जनरल भारताचे काम पहात होते.
Governor General of British India- Robert Clive | रॉबर्ट क्लाईव्ह
Governor-General of British India: रॉबर्ट क्लाईव्हच्या (757-1760, दुसऱ्यांदा 1765-1767) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
1757 ते 1760 व 1765 ते 1767 या काळात क्लाईव्ह दोनवेळा बंगालचा गव्हर्नर बनला.
प्लासीच्या युद्धात विजय (1757)
1765 मध्ये क्लाईव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. ऑगस्ट 1765 मध्ये क्लाईव्हने अलाहाबाद तहान्वये बादशहा शहाआलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतांच्या दिवाणीचे अधिकार मिळविले. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नबाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला. नबाबाला जबाबदार असे दोन नायब दिवाण नेमून क्लाईव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी सारा वसूल करण्याची जबाबदारी सोपविली.
दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार’ वसुलीचे सर्व अधिकार कंपनीकडे आले, परंतु त्याची जबाबदारी मात्र नबाबाकडे राहिली थोडक्यात, कोणत्याही परिश्रमांशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले.
Governor General of British India- Warren Hastings | वॉरन हेस्टिंग्ज
Governor-General of British India: वॉरन हेस्टिंग्जच्या(1772-1785) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली (1772)
रेग्युलेटिंग ॲक्ट (1773): यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरांवर नियंत्रण ठवण्याचे अधिकार प्राप्त झाले. यानुसार वॉरन हेस्टिंग्ज पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याच्या मदतीसाठी चार सदस्यीय समिती नेमन्यात आली आली.
पहिले इंग्रज मराठा युध्द (1775-82): साल्हबाईचा (1782) तहानुसार मराठ्यांना ठाणे व साष्ठी ही ठिकाणे मिळाली.
दुसरे म्हैसूर युध्द: इंग्रज-हैदर (1780) व इंग्रज-टिपु सुलतान (1782).1784 च्या मंगलोर तहाने हे युद्ध थांबले.
कलकत्त्यात ‘सरकारी टाकसाळ सुरू’ कागदी चलनाचा प्रयोग अयशस्वी.
याच्याच काळात कंपनीला मीठ बनवायचा अधिकार.
1781-कलकत्ताला अरेबिया व पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी मदरसाची स्थापना केली. हेस्टिंग्जला अरबी व फारसी माहिती असून तो बंगाली बोलायचा.
त्याने चार्ल्स विल्कीन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना लिहिली.
हेस्टिग्जने संन्याशांच्या बंडावर नियंत्रण लादले. ज्याचा उल्लेख बंकिमचंद्राच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत आहे.
विवाह कर बंद केले.
गुलामगिरीची प्रथा समाप्त केली.
पिट्स इंडिया ॲक्ट (1784): ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ या कायमस्वरुपी नियामक मंडळाची निर्मिती झाली. कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर्स त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले. या कायद्यानुसार ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ला इस्ट इंडिया कंपनीस भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला. पिट्स इंडिया ॲक्टमुळे ब्रिटिश पार्लमेंटला भारतातील कंपनी प्रशासनावर अप्रत्यक्ष नियंत्रण राखण्यात यश मिळाले.
कर वसुलीसाठी कर समिती/ रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली.
Governor General of British India- Lord Cornwallis | लॉर्ड कॉर्नवॉलिस
Governor-General of British India: लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या(प्रथम 1786-1793, दुसऱ्यांदा- 1805) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
तिसरे म्हैसूर युध्द – इंग्रज-टिपू सुलतान (1790-92), 1792 च्या श्रीरंगपट्टणमच्या तहाने हे युध्द संपले.
कॉर्नवॉलिसने भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवून त्यांना खासगी व्यापार करण्यास प्रतिबंध केला.
प्रशासनाच्या सोयीसाठी भारतीय प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख बनविला.
भारतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (ICS) ही परीक्षा सुरु करून त्यामार्फत सनदी अधिकाऱ्यांची भरती केली. कॉर्नवालिस यास ‘भारतीय नागरी सेवांचा जनक’ (Father of Indian Civil Services) असे म्हणतात.
बंगाल प्रांतात कायमधारा पध्दतीचा स्वीकार (1793): कॉर्नवालिसने सुरूवातीस दहा वर्षांच्या कराराने जमीनदारांना जमिनीचे वाटप केले. परंतू 1793 मध्ये सर जॉन शोअरच्या साथीने यावर पुन्हा अभ्यास करून त्याने जमीनदारांना जमिनीचे कायमचे मालकीहक्क दिले.
कॉनवालिस कोड ही नवी संहिता तयार केली.
1805 मध्ये कॉर्नवॉलीस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला. ऑक्टोबर 1805 मध्ये तापामुळे उत्तर प्रदेशातील गाझिपूर येथे त्याचा मृत्यू झाला.
Governor General of British India- Lord Hastings | लॉर्ड हेस्टिंग्ज
Governor-General of British India: लॉर्ड हेस्टिंग्जच्या(1813-23) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
नेपाळशी युद्ध झाले (1814-16) यातील विजया मुळे त्याचे नाव ठेवले ‘मार्किस ऑफ हेस्टिंग्ज'(इंग्लंडमधील उमरावांची पदवी).नेपाळशी सुगौलीचा करार (1823).
तिसरे मराठा युद्ध (1817-18) पेशवे पद समाप्त, 1818 ला मुंबई प्रातांची निर्मिती.
मद्रासमधे 1820 ला रयतवारी व्यवस्था-मुन्रो व रीडद्वारा.
कायमधारा पद्धत बंद
कलेक्टरांना पुन्हा न्यायिक अधिकार दिला.
पंजाब व आग्रा येथे महालवारी – मॅकन्शीद्वारा
Governor General of British India- Lord William Bentinck | लॉर्ड विल्यम बेंटिंग
Governor-General of British India: लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या(1823-33) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
1829 – सती प्रथा विरोधी कायदा( प्रथम बंगाल नंतर मुंबई मद्रास)
बेंटिंग च्या काळात इनाम कमिशनची(1828) स्थापना झाली.
1833 ला मेकॉलेच्या अध्यक्षतेखालील कमिशनची स्थापना झाली.
अलाहाबाद येथे उच्च मुलकी आणि फौजदारी न्यायालय ग्रँड ट्रंकरोडच्या निर्मितीस सुरुवात.
Governor General of British India- Charles Metcalfe | चार्ल्स मेंटाकाफ
Governor-General of British India: चार्ल्स मेंटाकाफच्या(1835-36) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
वयाची सोळा वर्ष पूर्ण व्हायच्या आत भारतात कलकत्यात दाखल झाला. त्यांनी चक्क एका शीख महिलेशी लग्न केले. लाहोरला असताना त्यांनी फाशीची शिक्षा बंद केली होती. भारताबरोबरच्या राजकीय व्यवहारात ते आक्रमक व ‘फॉरवर्ड पॉलिसी’ ठेवणारे होते.
याने वृत्तपत्रावरील बंधने काढली. त्यामुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जनक म्हटला जातो.
Governor General of British India- Lord Harding First | लॉर्ड हार्डिंग पहिला
Governor-General of British India: लॉर्ड हार्डिंग पहिला(1844-1848) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
भारतात प्रथमच शासकीय कार्यालयाने रविवारची सुट्टी जाहीर केली.
मध्य भारतातील गोंड जमातीतील नरबळी द्यायची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.
Governor General of British India- Lord Dalhousie | लॉर्ड डलहौसी
Governor-General of British India: लॉर्ड डलहौसीच्या(1846-1856) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
तो स्कॉटलंडमधील राजपुत्र होता. नियुक्तीच्या वेळी त्याचे वय 36 वर्षे होते. भारतीय राज्याचे ब्रिटिश साम्राज्यातील विलीनीकरण करण्याची कोणतीही संधी त्याने वाया घातली नाही. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याच्या कामाच्या व्यापकतेमुळे त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हटले जाते.
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…