Categories: Latest Post

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-12th July

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

Q1. महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलांतराच्या कारणांचा उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे.

(a) विवाह, कुटुंबासह, रोजगार, इतर कारणे, जन्मानंतर, शिक्षण

(b) विवाह, शिक्षण, जन्मानंतर, कुटुंबासह, रोजगार, इतर कारणे

(c) रोजगार, जन्मानंतर, शिक्षण, कुटुंबासह, विवाह, इतर कारणे

(d) शिक्षण, कुटुंबासह, विवाह, इतर कारणे, रोजगार, जन्मानंतर

 

Q2. प्रगत सिंचन सुविधा, पडीक जमिनींचे शेतजमिनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी शेत मजुरांची मागणी, या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते. अशा स्थलांतरास —-प्रकारचे स्थलांतर म्हणतात.

(a) शहरी ते शहरी

(b) ग्रामीण ते ग्रामीण

(c) ग्रामीण ते शहरी

(d) शहरी ते ग्रामीण

 

Q3. खालील दोन विधानांवर विचार कराः

  1. इतर राज्यांपैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचे स्थलांतराचे प्रमाण सर्वात अधिक असते तरी येणाऱ्या पुरुषांच्या प्रमाणाच्या ते 50% पेक्षा कमी आहे.
  2. कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या रित्रयांचे स्थलांतर दुसऱ्या क्रमांकाचे असून मात्र ते तेथून येणाऱ्या पुरुषांपेक्षा अधिक आहे .

पर्यायी उत्तरे:

(a) (1) आणि (2) बरोबर

(b) (1) बरोबर (2) चूक

(c) (1) चूक (2) बरोबर

(d) (1) आणि (2) चूक

 

Q4. महाराष्ट्रात भारताच्या सर्व दिशांनी स्थानांतर होत असते. याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

(a) महाराष्ट्रात होणारी (1/3) स्थानांतरे ही बिहारमधून होतात.

(b) बंगालमधून येणारे 30% पेक्षा जास्त स्थानांतरित पुरूष हे मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यात येतात.

(c) पुण्यात येणारे बहूसंख्य स्थानांतरित पुरूष हे उत्तर कर्नाटकामधून येतात.

(d) नागपूरला येणारे स्थानांतरित पुरुष हे तामिळनाडूतून येतात

 

Q5. पुर्णा नदी प्रकल्पांतर्गत पुर्णा नदीवर बांधलेली धरणे कोणती आहेत?

(a) येलदरी व सिध्देश्वर

(b) कावेरी व उजनी

(c) खडकवासला व उजनी

(d) जायकवाडी व पानशेत

 

Q6. मुंबई शहरात स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या :

  1. लोकसंख्येची आत्यंतिक घनता
  2. निवास स्थानाचा प्रश्
  3. बेसुमार झोपडपट्टीची वाढ
  4. वाहतुक कोंडी

पर्यायी उत्तरे :

(a) (1) आणि (2)

(b) (1), (2) आणि (3)

(c) (2), (3) आणि (4)

(d) वरीलसर्व

 

Q7. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो?

(a) कोयना

(b) राधानगरी

(c) उजनी

(d) भंडारदरा

 

Q8. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसते?

  1. कृष्णा व्हॅली
  2. वेण्णा व्हॅली
  3. टेहरी गढवाल व्हॅली
  4. सायलेंट व्हॅली

पर्यायी उत्तरे :

(a) (1) विधान बरोबर आहे.

(b) (2) विधान बरोबर आहे.

(c) (3) आणि (1) विधाने बरोबर आहेत.

(d) (4) विधान बरोबर आहे.

 

Q9. 1. कोयना जलविद्युत प्रकल्प, हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना, ह्यावर उभारला असून, हया धरणाच्या जलाशयाला मशिवसागरफ अशा नावाने ओळखले जाते.

  1. कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळूण तालुक्यात पोफळी येथे एक मोठे वीज निर्मिती केंद्र उभारले आहे.

पर्यायी उत्तरे :

(a) (1) व (2) बरोबर

(b) (1) बरोबर (2) चूक

(c) (1) चूक (2) बरोबर

(d) (1) व (2) चूक .

 

Q10. खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते?

(a) 1°से. दर 160 मी.ला

(b) 1°से. दर 170 मी.ला

(c) 1°से. दर 100 मी.ला

(d) 1°से. दर 260 मी.ला .

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

S1. Ans.(a)

Sol. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीतांचे प्रमाण आणि स्थलांतराच्या कारणानुसार उतरता क्रम पुढीलप्रमाणे:-

विवाह (35.64%), कुटुंबासह (17.23%), रोजगार (16.55%), इतर कारणे(16.42%), जन्मानंतर (12.25%), शिक्षण(1.45%), व्यवसाय(0.46%)

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये स्थलांतराचे प्रमाण आणि स्थलांतराच्या कारणानुसार उतरता क्रम :-

विवाह(34.4%), जन्मानंतर(19.3%), कुटुंबासमवेत(17.34%), रोजगार(15.40%), इतर कारणे (10.44%), शिक्षण(2.18%), व्यवसाय(0.87%)

 

S2. Ans.(b)

Sol. प्रगत सिंचन, पडिक जमिनीचे शेतजमिनीत रूपांतर शेतमजुरांची मागणी यामुळे इतर कृषीक्षेत्रात मागास ग्रामीण भागातील शेतमजूर या भागात स्थलांतर करतात. हे ग्रामीण ते ग्रामीण अशा प्रकारचे स्थलांतर असते.

ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतराची कारणे:- रोजगार, शिक्षण, उसतोड कामगार, व्यवसाय अशा अनेक कारणासाठी ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर होते पण यात विवाह हे मुख्य कारण आहे.

 

S3. Ans.(a)

Sol. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतरित लोक उत्तरप्रदेशमधून येतात. त्यांची एकुण संख्या 20.72 लाख आहे. त्यापैकी पुरुषांची 14.26 लाख संख्या आणि स्त्रीयांची संख्या 6.46 लाख आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे स्थलांतर कर्नाटक राज्यातून होते. कर्नाटक मधून महाराष्ट्रात एकुण 11.65 लाख लोक स्थालातरित झाले यापैकी पुरुषाची संख्या 5.36 लाख तर स्त्रियांची संख्या 6.29 लाख आहे.

 

S4. Ans.(c)

Sol. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर उत्तरप्रदेशातून होते.

स्थलांतरितांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरूषांची संख्या जास्त आहे, कारण पुरूष हा रोजगार व नोकरीसाठी स्त्रियांच्या तुलनेत जास्त स्थलांतर करतो.

महाराष्ट्रात होणारी 1/3 स्थलांतरे ही उत्तरप्रदेश (28.3 टक्के) राज्यातून आहेत.

पश्‍चिम बंगालमधून स्थलांतरित होणाच्या पुरूषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

पश्‍चिम बंगालमधून होणारे स्थलांतर प्रामुख्याने. नागपूर व इतर जिल्ह्यात जास्त आहे.

 

S5. Ans.(a)

Sol. पुर्णा नदी प्रकल्प :

उगम अजंठा रांगेत होतो.

विस्तार – औरंगाबाद, जालना, बुलडाणा, परभणी, हिंगोली, पूर्णा नदी ही गोदावरीची उपनदी आहे.

धरणे – 1) येलदरी – परभणी

2) सिद्धेश्वर – हिंगोली – परभणी

 

S6. Ans.(c)

Sol. स्थलांतर – विशिष्ट कालावधीत एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कारणांसाठी दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात जाऊन वास्तव्य करणे.

मुंबईतील स्थलांतर :

औद्योगिक विकासामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर, पूर्ण भारतातून मुंबईत रोजगारासाठी येतात व येथेच राहतात. स्वातंत्र्यपूर्व काळातही गिरणी कामासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून मोठे स्थलांतर झाले.

महाराष्ट्राला सीमा असणाऱ्या राज्यातून स्त्रियांचे स्थलांतर जास्त आहे.

स्थलांतराचे प्रकार :

  1. G2S – रोजगारासाठी (ग्रामीण ते शहरी)
  2. S2G – सेवानिवृतीनंतर (शहरी ते ग्रामीण)
  3. S2S – नोकरी व व्यवसायामुळे – पुरूष अधिक (शहरी ते शहरी)
  4. G2G – लग्नामुळे (ग्रामीण ते ग्रामीण)

 

S7. Ans.(a)

Sol. कोयना :

1951 मध्ये कोयना बांधकाम विभागाने प्रकल्पाची सुरूवात केली.

प्रकल्पाचा दुसरा टप्पा जागतिक बँकेच्या कर्जामुळे पूर्ण झाला.

1953 मध्ये प्रकल्पाला मंजुरी आणि 1954 मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले.

कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण वीजनिर्मिती क्षमता 1920 मेगावॅट आहे. या प्रकल्पामध्ये एकूण चार केंद्रे आहेत.

कोयना धरणाची जलसाठवण क्षमता – 105 टीएमसी आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पाला आधुनिक/अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते.

या विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा सहभाग महत्त्वाचा आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे – अण्विक, औष्णिक, व जलविद्युत केंद्रामधून निर्माण होणारी वीज एकत्र करून संपूर्ण राज्यात विजेचे जाळे उभारले आहे.

हा विस्तृत जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो.

पोकळी येथे वीज केंद्र उभारण्यात आले आहे.

 

S8. Ans.(a)

Sol. धोम धरण

सातारा जिल्ह्यात वाईजवळ आहे.

कृष्णा नदीवर धोम धरण बांधले आहे

कृष्णा व्हॅलीमधून धोम धरण व पूर्ण व्हॅलीचा नजारा अप्रतिम दिसतो.

सायलेंट व्हेली :

निलगिरी टेकड्यात वसलेली आहे.

केरळ राज्यात आहे. (पल्लाकड जिल्हा)

हे नॅशनल पार्क आहे.

 

S9. Ans.(a)

Sol. कोयना धरण (शिवसागर सरोवर):

ठिकाण – कोयनानगर, सातारा

महाराष्ट्रातील दुसरा मोठा प्रकल्प

महाबळेश्वरला उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हा प्रकल्प आहे.

1956 मध्ये सुरूवात तर, 1964 ला काम पूर्ण झाला.

डबल काँक्रीट डॅम आहे.

103 मीटर उंची, 807 मीटर लांबी

पाणी साठवणक्षमता – 105 टीएमसी

क्षमता 1920 मेगावॅट वीजनिर्मिती (सर्वाधिक)

कोयना नदी – ही कृष्णेची उपनदी असून दोन्ही महाबळेश्वरमध्ये उगम पावतात.

लेक टॅपिंग: कोयना जलाशयात हा प्रयोग प्रथम 13 मार्च 1999 रोजी झाला.

 

S10. Ans.(a)

Sol. वाढत्या उंचीनुसार हवेचे तापमान कमी होत जाते, यास तापमान ऱ्हास प्रमाण असे म्हणतात.

1km उंचीला 6.5° से. किंवा 160 मीटर उंच गेल्यास 1°से. या प्रमाणे कमी-कमी होत जाते.

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

Tejaswini

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

33 mins ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

54 mins ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

2 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

3 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

4 hours ago