Marathi govt jobs   »   Study Materials   »   Governor General of British India before...

Governor General of British India before 1857, Study Material for Nagar Parishad, ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे

Table of Contents

Governor General of British India

Governor General of British India before 1857: In this article get the complete list of Governor General of British India before 1857 and Governor General of Bengal. Also we will learn some of the important points regarding each Governor General of British India in Marathi. Exam point of view this topic is very important. So let’s start.

नगर परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक 

नगरपरिषद वेळापत्रक 2023 भाग 3 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Governor General of British India before 1857: Overview

Every subject is important in competitive exam, so you should study according to that pattern to get good success in competitive exam. For the convenience of students we are bringing information on important topics every day so that you can study the topic well by reading the article.

Governor General of British India before 1857: Overview
Category Study Material
Subject Modern History
Useful for Nagar Parishad Bharti & Other Competitive Exams
Article Name List of Viceroys of India
Last Governor General of British India Lord Canning

Governor General of British India before 1857 | ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, 1857 च्या आधीचे

Governor-General of British India: स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता इतिहास या विषयात स्वतंत्रपणे व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित थेट प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत व्हॉईसरॉय व गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण Governor General of British India before 1857 (ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.

भारतात व्यापाराच्या उद्देशाने लंडनमध्ये 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणीने सुरुवातीस 15 वर्षासाठी या कंपनीस पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सनद दिली. 1609 मध्ये राजा जेम्स पहिला यांनी कंपनीला अमर्याद कालावधीसाठी व्यापाराचा अधिकार दिला. कंपनीच्या वतीने गव्हर्नर जनरल भारताचे काम पहात होते. 

List of Viceroys of India

Revolt of 1857 in India and Maharashtra

List of Governor General of Bengal | बंगालच्या गव्हर्नर जनरलची यादी

वर्ष/ कालावधी नाव  कार्यकाळातील घटना
1772-1785 वॉरन हेस्टिंग्ज
  •  ते बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते
  • दुहेरी प्रशासन व्यवस्था संपवली.
  • उपलब्धी: 1773 चा नियमन कायदा, कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि बंगालची एशियाटिक सोसायटी.
  • त्यांनी पहिले इंग्रज-मराठा युद्ध केले आणि सालबाईच्या तहावर स्वाक्षरी केली.
  • भगवद्गीतेचा पहिला इंग्रजी अनुवाद त्यांच्याच कार्यकाळात झाला.
1786-1793 लॉर्ड कॉर्नवॉलिस
  • त्यांनी अपीलीय न्यायालये, निम्न दर्जाची न्यायालये आणि संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली.
  • तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध झाले आणि सेरिंगापटमचा तह झाला.
  • कायमस्वरूपी सेटलमेंट आणि नागरी सेवांचा परिचय.
1793-1798 सर जॉन शोर
  •  सन 1793 चा सनद कायदा तो आल्यावर पास झाला.
  • अहस्तक्षेप धोरण आणि खर्ड्याची लढाई ही त्यांची कामगिरी आहे.
1798-1805 लॉर्ड वेलस्ली
  • सब्सिडियरी अलायन्स सिस्टम सादर केली.
  • चौथे अँग्लो-म्हैसूर युद्ध आणि बसेनचा तह, दुसरे अँग्लो-मराठा युद्ध यांसारखी युद्धे लढली.
  • मद्रास प्रेसिडेन्सी आणि कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली
1805-1807 सर जॉर्ज बार्लो
  • लॉर्ड मिंटो येईपर्यंत ते भारताचे कार्यवाहक गव्हर्नर जनरल होते.
  • अर्थव्यवस्थेची आवड आणि छाटणीमुळे ब्रिटिश प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी होण्याचे कारण.
  • त्यांच्या कार्यकाळात 1806 मध्ये वेल्लोरचा विद्रोह झाला.
1807-1813 लॉर्ड मिंटो आय
  • 1809 मध्ये महाराजा रणजित सिंग यांच्यासोबत अमृतसरचा तह झाला.
  • सन 1813 चा चार्टर कायदा आणला.
1813-1823 लॉर्ड हेस्टिंग्ज
  • हस्तक्षेप न करण्याच्या धोरणाचा अंत
  • अँग्लो-नेपाळ युद्ध (1814-16) आणि सागौलीचा तह, 1816
  • पेशवाईचे उच्चाटन
  • मद्रास आणि मुंबईत रयतवारी प्रणालीची स्थापना
  • उत्तर-पश्चिम प्रांत आणि मुंबईतील महालवारी प्रणाली
1823-1828 लॉर्ड एमहर्स्ट
  • आसामचे विलयीकरण, 1824 चे पहिले बर्मी युद्ध.

List of Governor General of India | भारताच्या गव्हर्नर जनरलची यादी

वर्ष गव्हर्नर जनरलचे नाव कार्यकाळातील प्रमुख घडामोडी
1828-1835  लॉर्ड विल्यम बेंटिंक
  • 1833 च्या चार्टर अॅक्टमधील नियमांनुसार भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल.
  • सती प्रथा रद्द केली, भ्रूणहत्या आणि बालबलिसह थुगी प्रथा दडपल्या.
  • 1835 चा इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट प्रस्तावित केला आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कोलकाता स्थापन केले.
1835-1836 लॉर्ड चार्ल्स मेटकाफ
  • भारतीय प्रेसचे मुक्तिदाता कारण त्याने उघडपणे भारतातील खुल्या प्रेसवरील निर्बंध मागे घेतले
1836-1842 लॉर्ड ऑकलंड
  • घरगुती शाळांमध्ये सुधारणा.
  • भारताच्या व्यावसायिक उद्योगाचा विस्तार.
  • पहिले अँग्लो-अफगाण युद्ध.
1842-1844 लॉर्ड एलेनबरो
  •  सिंध जोडला गेला.
1844-1844 लॉर्ड हार्डिंग आय
  • पहिले अँग्लो सिख युद्ध.
1848-1856 लॉर्ड डलहौसी
  • दुसरे अँग्लो-सिख युद्ध (1848-49)
  • लॅप्सच्या सिद्धांताचा परिचय
  • वुड्स डिस्पॅच 1854
  • 1853 मध्ये मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा पहिला रेल्वे मार्ग
  • PWD ची स्थापना
  • भारतीय पोस्ट ऑफिस कायदा
1856-1857 लॉर्ड कॅनिंग
  • कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे विद्यापीठे स्थापन झाली.
  • 1857 चा उठाव

States and Their Capitals, 28 States and 8 Union Territories in India 2021

Governor General of British India- Robert Clive | रॉबर्ट क्लाईव्ह

Governor General of British India- Robert Clive
Robert Clive

Governor-General of British India: रॉबर्ट क्लाईव्हच्या (757-1760, दुसऱ्यांदा 1765-1767)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • 1757 ते 1760 व 1765 ते 1767 या काळात क्लाईव्ह दोनवेळा बंगालचा गव्हर्नर बनला.
  • प्लासीच्या युद्धात विजय (1757)
  • 1765 मध्ये क्लाईव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. ऑगस्ट 1765 मध्ये क्लाईव्हने अलाहाबाद तहान्वये बादशहा शहाआलमकडून बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतांच्या दिवाणीचे अधिकार मिळविले. हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नबाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला. नबाबाला जबाबदार असे दोन नायब दिवाण नेमून क्लाईव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी सारा वसूल करण्याची जबाबदारी सोपविली.
  • दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार’ वसुलीचे सर्व अधिकार कंपनीकडे आले, परंतु त्याची जबाबदारी मात्र नबाबाकडे राहिली थोडक्यात, कोणत्याही परिश्रमांशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले.

Important Passes in Maharashtra

Governor General of British India- Warren Hastings | वॉरन हेस्टिंग्ज 

Governor General of British India- Warren Hastings
Warren Hastings

Governor-General of British India: वॉरन हेस्टिंग्जच्या(1772-1785)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली (1772)
  • रेग्युलेटिंग ॲक्ट (1773): यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरांवर नियंत्रण ठवण्याचे अधिकार प्राप्त झाले. यानुसार वॉरन हेस्टिंग्ज पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याच्या मदतीसाठी चार सदस्यीय समिती नेमन्यात आली आली.
  • पहिले इंग्रज मराठा युध्द (1775-82): साल्हबाईचा (1782) तहानुसार मराठ्यांना ठाणे व साष्ठी ही ठिकाणे मिळाली.
  • दुसरे म्हैसूर युध्द: इंग्रज-हैदर (1780) व इंग्रज-टिपु सुलतान (1782).1784 च्या मंगलोर तहाने हे युद्ध थांबले.
  • कलकत्त्यात ‘सरकारी टाकसाळ सुरू’ कागदी चलनाचा प्रयोग अयशस्वी.
  • याच्याच काळात कंपनीला मीठ बनवायचा अधिकार.
  • 1781-कलकत्ताला अरेबिया व पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी मदरसाची स्थापना केली. हेस्टिंग्जला  अरबी व फारसी माहिती असून तो बंगाली बोलायचा.
  • त्याने चार्ल्स विल्कीन्सनच्या प्रथम गीता अनुवादाला प्रस्तावना लिहिली.
  • हेस्टिग्जने संन्याशांच्या बंडावर नियंत्रण लादले. ज्याचा उल्लेख बंकिमचंद्राच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत आहे.
  • विवाह कर बंद केले.
  • गुलामगिरीची प्रथा समाप्त केली.
  • पिट्स इंडिया ॲक्ट (1784): ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ या कायमस्वरुपी नियामक मंडळाची निर्मिती झाली. कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर्स त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले. या कायद्यानुसार ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ला इस्ट इंडिया कंपनीस भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला.  पिट्स इंडिया ॲक्टमुळे ब्रिटिश पार्लमेंटला भारतातील कंपनी प्रशासनावर अप्रत्यक्ष नियंत्रण राखण्यात यश मिळाले.
  • कर वसुलीसाठी कर समिती/ रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली.

Five Year Plans of India

Governor General of British India- Lord Cornwallis | लॉर्ड कॉर्नवॉलिस 

Governor General of British India- Lord Cornwallis
Lord Cornwallis

Governor-General of British India: लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या(प्रथम 1786-1793, दुसऱ्यांदा- 1805)  कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • तिसरे म्हैसूर युध्द – इंग्रज-टिपू सुलतान (1790-92), 1792 च्या श्रीरंगपट्टणमच्या तहाने हे युध्द संपले.
  • कॉर्नवॉलिसने भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढवून त्यांना खासगी व्यापार करण्यास प्रतिबंध केला.
  • प्रशासनाच्या सोयीसाठी भारतीय प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख बनविला.
  • भारतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (ICS) ही परीक्षा सुरु करून त्यामार्फत सनदी अधिकाऱ्यांची भरती केली. कॉर्नवालिस यास ‘भारतीय नागरी सेवांचा जनक’ (Father of Indian Civil Services) असे म्हणतात.
  • बंगाल प्रांतात कायमधारा पध्दतीचा स्वीकार (1793): कॉर्नवालिसने सुरूवातीस दहा वर्षांच्या कराराने जमीनदारांना जमिनीचे वाटप केले. परंतू 1793 मध्ये सर जॉन शोअरच्या साथीने यावर पुन्हा अभ्यास करून त्याने जमीनदारांना जमिनीचे कायमचे मालकीहक्क दिले.
  • कॉनवालिस कोड ही नवी संहिता तयार केली.
  • 1805 मध्ये कॉर्नवॉलीस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला. ऑक्टोबर 1805 मध्ये तापामुळे उत्तर प्रदेशातील गाझिपूर येथे त्याचा मृत्यू झाला.

Forests In Maharashtra

Governor General of British India- Sir John Shore | सर जॉन शोअर

Governor General of British India- Sir John Shore
Sir John Shore

Governor-General of British India: सर जॉन शोअरच्या(1793-1798) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • 1793 चा चार्टर ॲक्ट
  • खर्डाचे युद्ध – निजाम व मराठ्यांमधे (1795).
  • अहमदशहा अब्दालीचा नातू ‘झमनशहाचे’ भारतावर आक्रमण.

Governor General of British India – Lord Richard Wellesley | लॉर्ड रिचर्ड वेलस्ली

Governor General of British India – Lord Richard Wellesley
Lord Richard Wellesley

Governor-General of British India: लॉर्ड रिचर्ड वेलस्लीच्या(1798-1805) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • तैनाती फौज/साहाय्यक संधी (Subsidiary Alliance) ची सुरुवात. ही सर्वात प्रथम निजामने स्वीकारली (1798).
  • हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना (1800).
  • चौथे म्हैसूर युद्ध (1799) यात टीपूचा मृत्यू
  • दुसरे मराठा युद्ध (1803-1805).
  • 1802 ला बसई (Basin) चा तह पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
  • 1803 साली लॉर्ड लेकने दिल्ली व आग्य्रावर कब्जा करून मुगल सम्राट शाहआलमला ताब्यात घेतले.
  • तंजौर (1799), सुरत (1800), कर्नाटक (1801) ताब्यात घेतले.
  •  वेलस्ली ब्रिटनच्या संसदेचा सदस्य होता.
  • नेपोलियन व इंग्लंडमधे झालेल्या अमिन्सच्या तहानुसार पाँडिचेरी फ्रेंचांना परत (1802).
  • शेतसारा धान्याऐवजी पैशात स्वीकारण्यास सुरुवात .

Governor General of British India- Minto | लॉर्ड मिंटो

Governor-General of British India: लॉर्ड मिंटोच्या(1807-1813) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • रणजीत सिंहसोबत 1809 चा अमृतसरचा करार.
  • 1813 चा चार्टर ॲक्ट.

UNESCO World Heritage Sites in India 2023

Governor General of British India- Lord Hastings | लॉर्ड हेस्टिंग्ज

Governor-General of British India: लॉर्ड हेस्टिंग्जच्या(1813-23) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • नेपाळशी युद्ध झाले (1814-16) यातील विजया मुळे त्याचे नाव ठेवले ‘मार्किस ऑफ हेस्टिंग्ज'(इंग्लंडमधील उमरावांची पदवी).नेपाळशी सुगौलीचा करार (1823).
  • तिसरे मराठा युद्ध (1817-18) पेशवे पद समाप्त, 1818 ला मुंबई प्रातांची निर्मिती.
  • मद्रासमधे 1820 ला रयतवारी व्यवस्था-मुन्रो व रीडद्वारा.
  • कायमधारा पद्धत बंद
  • कलेक्टरांना पुन्हा न्यायिक अधिकार दिला.
  • पंजाब व आग्रा येथे महालवारी – मॅकन्शीद्वारा

Governor General of British India- Lord William Bentinck | लॉर्ड विल्यम बेंटिंग

Governor General of British India- Lord William Bentinck
Lord William Bentinck

Governor-General of British India: लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या(1823-33) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • 1829 – सती प्रथा विरोधी कायदा( प्रथम बंगाल नंतर मुंबई मद्रास)
  • बेंटिंग च्या काळात इनाम कमिशनची(1828) स्थापना झाली.
  • 1833 ला मेकॉलेच्या अध्यक्षतेखालील  कमिशनची स्थापना झाली.
  • अलाहाबाद येथे उच्च मुलकी आणि फौजदारी न्यायालय ग्रँड ट्रंकरोडच्या निर्मितीस सुरुवात.

Governor General of British India-  Charles Metcalfe | चार्ल्स मेंटाकाफ

Governor-General of British India: चार्ल्स मेंटाकाफच्या(1835-36) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • वयाची सोळा वर्ष पूर्ण व्हायच्या आत भारतात कलकत्यात दाखल झाला. त्यांनी चक्क एका शीख महिलेशी लग्न केले. लाहोरला असताना त्यांनी फाशीची शिक्षा बंद केली होती. भारताबरोबरच्या राजकीय व्यवहारात ते आक्रमक व ‘फॉरवर्ड पॉलिसी’ ठेवणारे होते.
  • याने वृत्तपत्रावरील बंधने काढली. त्यामुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जनक म्हटला जातो.

Governor General of British India- Lord Harding First | लॉर्ड हार्डिंग पहिला

Governor-General of British India: लॉर्ड हार्डिंग पहिला(1844-1848) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • भारतात प्रथमच शासकीय कार्यालयाने रविवारची सुट्टी जाहीर केली.
  • मध्य भारतातील गोंड जमातीतील नरबळी द्यायची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

Gandhian Era

Governor General of British India- Lord Dalhousie | लॉर्ड डलहौसी

Governor General of British India- Lord Dalhousie
Lord Dalhousie

Governor-General of British India: लॉर्ड डलहौसीच्या(1846-1856) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे

  • तो स्कॉटलंडमधील राजपुत्र होता. नियुक्तीच्या वेळी त्याचे वय 36 वर्षे होते. भारतीय राज्याचे ब्रिटिश साम्राज्यातील विलीनीकरण करण्याची कोणतीही संधी त्याने वाया घातली नाही. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याच्या कामाच्या व्यापकतेमुळे त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हटले जाते.
  • खालसा पद्धतीने राज्यांचे विलीनीकरण- सातारा, जयपुर, संबळपूर, बघाट, उदयपूर, झाशी, नागपूर, अवध
  • दुसरे शीख युद्ध(1848-49),पंजाबचे विलीनीकरण(1849)
  • नानासाहेब पेशवे यांची पेन्शन बंद केली.
  • सिमल्याला वर्षातील काही दिवस राजधानी म्हणून घोषित केले
  • डलहौसीचे संस्थाने खालसा धोरण पूर्वी लॉर्ड ऑकलंड या गव्हर्नर जनरल ने स्वीकारले होते.
  • लष्करातील बदल- बंगाल तोफखान्याच्या मुख्यालय कलकत्त्याहून मेरठ  आणले. सेनेचे मुख्यालय सिमला केले सैन्यात इंग्रजांची संख्या वाढून भारतीयांची कमी केली.
  • गव्हर्नर जनरलला त्याच्या कामात मदतीसाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त केला.
  • अभियांत्रिकी विद्यालय रुरकी येथे स्थापन केले.
  • पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे(1853) येथे सुरु केली.
  • ग्रँड ट्रॅक रोड ची दुरुस्ती केली.
  • पोस्ट ऑफिस ॲक्ट(1854)- पहिल्यांदा तिकीट सुरू केले.
  • सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना
  • विधवा पुनर्विवाह कायदा
  • 1853 चार्टर ॲक्ट – स्पर्धा परीक्षेची सुरुवात
  • मुक्त व्यापार नीतीचा समर्थक- खुल्या व्यापाराच्या तत्त्वाने भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली.
Chief Minister of Maharashtra
Adda247 Marathi App

FAQs Governor General of British India (Before 1857)

Q.1 इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. इतिहास या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.2 कॉनवालिस कोड ही नवी संहिता कोणी तयार केली?

Ans: कॉनवालिस कोड ही नवी संहिता लॉर्ड कॉर्नवॉलिस ने तयार केली.

Q.3  गव्हर्नर जनरल याची माहिती कुठे मिळेल?

Ans. गव्हर्नर जनरल याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

Where can I find information on the topic of history?

Information on the topic of history can be found on Adda247 Marathi app and website.

Where can be found the information about Governor General of British India ?

Information about Governor General of British India can be found on Adda247 Marathi app and website.

Who created the Cornwallis code?

The Cornwallis code created by Lord Cornwallis.