Marathi govt jobs   »   Study Materials   »   1942 छोडो भारत चळवळ

1942 छोडो भारत चळवळ : MPSC 2024 अभ्यास साहित्य

1942 छोडो भारत चळवळ

1942 छोडो भारत चळवळ: 8 आणि 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी गवालिया टँक मैदान, मुंबई (जे आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून प्रसिद्ध आहे) येथे भारत छोडो आंदोलन (Quit India Movement) सुरू केले होते. ही एक चळवळ होती ज्याचे ध्येय भारतातून ब्रिटीश साम्राज्य संपवणे हे होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी ही चळवळ सुरू केली होती.

दोन घोषणांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले, एक म्हणजे ‘Quit India‘ किंवा ‘भारत छोडो’ आणि दुसरी म्हणजे ‘करो किंवा मरो (Do or Die)’. भारत छोडो आंदोलन ही एक शांततापूर्ण आणि अहिंसक चळवळ मानली जात होती, ज्याचा उद्देश फक्त ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याची आणि स्वातंत्र्य देण्यास उद्युक्त करणे होते. गांधींनी प्रत्येक वयोगटाला आणि भारतातील कार्यरत गटाला चळवळीबद्दल स्वतंत्र सूचना दिल्या. या लेखात चळवळीच्या तरतुदी, गांधींनी दिलेल्या सूचना, घोषणा, भारत छोडो आंदोलनाची कारणे आणि परिणाम याबद्दल माहिती मिळेल.

MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1942 छोडो भारत चळवळ: विहंगावलोकन

खालील तक्त्यात 1942 छोडो भारत चळवळ या विषयी विहंगावलोकन दिले आहे.

1942 छोडो भारत चळवळ : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC 2024
विषय आधुनिक भारताचा इतिहास
टॉपिकचे नाव 1942 छोडो भारत चळवळ
लेखातील प्रमुख मुद्दे
  • 1942 छोडो भारत चळवळ या विषयी सविस्तर माहिती

भारत छोडो आंदोलनाचा इतिहास

इंग्लंड महायुद्धात बुचकळ्यात पडलेला पाहून नेताजींनी आझाद हिंद फौजेला ‘दिल्ली चलो’चा नारा देताच, प्रसंगाची निकड ओळखून गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 च्या रात्री बॉम्बे मध्ये ब्रिटिशांना ‘छोडो भारत’ चा नारा दिला आणि भारतीयांना “करा किंवा मरा” चा आदेश जारी केला आणि सरकारी संरक्षणात येरवडा पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये ते गेले. 9 ऑगस्ट 1942 रोजी लाल बहादूर शास्त्री यांनी या आंदोलनाला उग्र स्वरूप दिले.

9 ऑगस्ट 1925 रोजी ‘बिस्मिल’ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान प्रजातंत्र संघाच्या दहा लढाऊ कार्यकर्त्यांनी ब्रिटीश सरकारचा पाडाव करण्याच्या उद्देशाने ‘काकोरी कट’ केला होता, त्या स्मृती ताज्या राहाव्यात म्हणून, दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात ‘काकोरी कट स्मृतीदिन’ साजरा करण्याची परंपरा भगतसिंग यांनी सुरू केली होती आणि या दिवशी मोठ्या संख्येने तरुण जमायचे. त्यामुळेच गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 हा दिवस विचारपूर्वक रणनीतीनुसार निवडला होता.

भारत छोडो आंदोलनाची कारणे

  1. Failure of Cripps Mission (क्रिप्स मिशनचे अपयश): चळवळीचे तात्काळ कारण म्हणजे क्रिप्स मिशनचे (Cripps Mission) अपयशी ठरणे. स्टॅफोर्ड क्रिप्सच्या अंतर्गत, नवीन संविधान आणि स्वराज्याच्या भारतीय प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मिशन पाठवले गेले होते परंतु हा मिशन अयशस्वी झाला कारण त्याने भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिले नाही तर फाळणीसह भारताला डोमिनियन दर्जा दिला.
  2. Indian Involvement in World War II (पूर्व सल्लामसलत न करता दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग) : दुसऱ्या महायुद्धात भारताकडून ब्रिटीशांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ब्रिटीश गृहीतक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने चांगले घेतले नाही.
  3. Prevalence of anti-British Sentiment (ब्रिटीशविरोधी भावनांचा प्रसार): ब्रिटीशविरोधी भावना आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय झाली होती.
  4. Shortage of Essential Commodities (जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा) : दुसऱ्या महायुद्धामुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला आली होती.

भारत छोडो आंदोलनाच्या तरतुदी

Provisions of Quit India Movement:

  • भारतातील ब्रिटिश राजवटीचा तात्काळ अंत करणे (immediate end of British rule in India)
  • सर्व प्रकारच्या साम्राज्यवाद आणि फॅसिझमपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुक्त भारत वचनबद्धतेची घोषणा. (free India commitment)
  • इंग्रजांच्या माघारीनंतर भारतात हंगामी सरकारची स्थापना करणे. (formation of a provisional government of India)
  • सविनय कायदेभंग चळवळ मंजूर करणे. (civil disobedience movement)

भारत छोडो आंदोलनाच्या घोषणा

  • ‘भारत छोडो’ किंवा ‘Quit India
  • ‘करो किंवा मरो (Do or Die)’.

भारत छोडो आंदोलनाचे परिणाम

Outcomes of Quit India Movement: भारत छोडो आंदोलन किंवा चळवळीचे positive आणि negative अशे दोन्ही परिणाम झाले. खाली भारत छोडो आंदोलन यश आणि अपयश काय होते याची माहिती दिली आहे.

Positive Outcomes of Quit India Movement

  • भावी नेत्यांचा उदय: राम मनोहर लोहिया, जे.पी. नारायण, अरुणा असफ अली, बिजू पटनायक, सुचेता कृपलानी इत्यादी नेत्यांनी भूमिगत हालचाली केल्या, जे नंतर प्रमुख नेते म्हणून उदयास आले.

  • महिलांचा सहभाग: या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग होता. उषा मेहता सारख्या महिला नेत्याने भूमिगत रेडिओ स्टेशन स्थापन करण्यास मदत केली ज्यामुळे चळवळीबद्दल प्रबोधन झाले.

  • राष्ट्रवादाचा उदय: भारत छोडो आंदोलनामुळे एकता आणि बंधुत्वाची भावना निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेज सोडले, लोकांनी नोकऱ्या सोडल्या आणि बँकांमधून पैसे काढले.

  • स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला: 1944 मध्ये भारत छोडो मोहीम चिरडली जात असताना, ब्रिटीशांनी तात्काळ स्वातंत्र्य देण्यास नकार दिले, परंतु दुस-या महायुद्धाच्या खर्चामुळे भारतावर दीर्घकाळ सत्ता चालवता येणार नाही याची त्यांना महत्त्वाची जाणीव झाली. यामुळे ब्रिटिशांशी राजकीय वाटाघाटीचे स्वरूप बदलले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला.

Negative Outcomes of Quit India Movement

  • आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचार झाला जो पूर्वनियोजित नव्हता. ही चळवळ ब्रिटिशांनी हिंसकपणे दडपली – लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला, गावे जाळली गेली आणि प्रचंड दंड ठोठावण्यात आला. 1,00,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने हिंसाचाराचा अवलंब केला.
  • महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इतर सर्व प्रमुख भारतीय नेत्यांना अटक करण्यात आले.
  • त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले.
MPSC परीक्षा 2024 : अभ्यास साहित्य योजना : सामान्य ज्ञान(GS) 
तारीख टॉपिक
31 डिसेंबर  2023 जालियनवाला बाग हत्याकांड
1 जानेवारी  2024 गांधी युग
3 जानेवारी 2024 रक्ताभिसरण संस्था
5 जानेवारी 2024 प्राकृतिक महाराष्ट्र – कोकण किनारपट्टी
  7 जानेवारी  2024 1857 चा उठाव
9 जानेवारी  2024 प्राण्यांचे वर्गीकरण -असमपृष्ठरज्जू प्राणी
11 जानेवारी 2024 राज्यघटना निर्मिती
13 जानेवारी 2024 अर्थसंकल्प
15 जानेवारी 2024 महाराष्ट्र – स्थान व विस्तार
17 जानेवारी 2024 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना व वाटचाल
19 जानेवारी 2024 मूलभूत हक्क
21 जानेवारी 2024 वैदिक काळ
23 जानेवारी 2024 सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
25 जानेवारी 2024 शाश्वत विकास
27 जानेवारी 2024 महर्षी कर्वे व त्यांचे कार्य

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारत छोडो आंदोलनाचे दुसरे नाव काय आहे?

भारत छोडो आंदोलनाला ऑगस्ट क्रांती आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात.

भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले?

दुसऱ्या महायुद्धात 8 आणि 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू झाले होते.

भारत छोडो आंदोलनाचे ध्येय काय होते?

भारत छोडो आंदोलनाचे ध्येय भारतातून ब्रिटीश साम्राज्य संपवणे हे होते.

भारत छोडो आंदोलन कोणी सुरू केले?

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले होते.