कोविड पीडितांच्या अवलंबितांना पेन्शन देण्याची योजना सरकारने जाहीर केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने कोविडमुळे कमाई करणारा सदस्य गमावलेल्या कुटुंबासाठी होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी दोन प्रमुख उपायांची घोषणा केली. प्रथम, सरकारने अशा कुटुंबांना कौटुंबिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि दुसरे म्हणजे, त्यांना वर्धित आणि उदारीकृत विमा भरपाई प्रदान करण्यात येईल.
योजनांशी संबंधित मुख्य तथ्ये:
1.कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन
- अशा व्यक्तींच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना विद्यमान नियमांनुसार कामगारांनी काढलेल्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% इतक्या पेन्शनचा लाभ मिळण्याचा हक्क असेल.
- हा लाभ 24 मार्च 2020 पासून 24 मार्च 2022 पर्यंत लागू होईल.
२. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना- कर्मचार्यांची ‘डिपॉझिट लिंक्ड विमा योजना’ (ईडीएलआय)
- खासकरुन कोविडमुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी ईडीएलआय योजनेतील विम्याचा लाभ वाढवून उदारीकरण करण्यात आले आहे.
- जास्तीत जास्त विमा लाभाची रक्कम सहा लाखांवरून वाढवून रू. 7 लाख करण्यात आली आहे.
- किमान विमा लाभाची तरतूद अडीच लाख रुपये केली आहे.
- हा लाभ 15 फेब्रुवारी 2020 पासून पूर्वलक्षीरित्या पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू होईल.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi
App- Adda247 (मराठी भाषा)
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो